अठराव्या शतकातील दिन दलित दुबळ्यांचा आधार , स्त्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि सर्वाना समानतेचा हक्क
मिळावा म्हणून अभूतपूर्व कार्य करणारे म्हणजे महात्मा जोतिबा फुले त्यांच्या स्मृतीला प्रथम अभिवादन.
ज्योतिबांचे मूळ गाव ( वाड वडिलांचे ) साताऱ्या जवळील कटगुण आणि त्यांचे मूळ आडनाव हे " गोऱ्हे " होय .
जेव्हा पुढे गोऱ्हे कुटुंब पुण्यात स्थायिक झाले. तेथे ज्योतीबांचे वडील गोविंदपंत फुलांचा व्यवसाय करून
उपजीविका करीत होते आणि त्यात फार यश मिळविले त्यामुळे पुढे हळूहळू गोऱ्हे हे आडनाव जावून त्यांना
‘फुले’ हे नाव मिळाले ते कायमचेच . नंतर गोविंदरावांनी धनकवडीच्या झगडे घराण्यातील चिमणाबाई सोबत
विवाह केला. त्यांना दोन मुले झाली. थोरला राजाराम व धाकटा ज्योतिबा,
जोतिबा फुले यांचा जन्म २० फेब्रुवारी १८२७ रोजी पुण्यास झाला.वयाच्या सातव्या वर्षी ज्योतिबा शाळेत जावू
लागले. पण ‘शूद्राने शाळेत शिक्षण घेणे हे महापाप आहे’ असे काही लोकांनी गोविन्रावांचे कान फुंकल्यामुळे
त्यांनी आपल्या मुलाला शाळेतून काढून मळ्यातील कामाला जुंपले. पण तिथेही फावल्या वेळेत तो पुस्तके
वाचण्यात रमल्याचे पाहून एका मुसलमान व एका इंग्रज गृह्स्थाने गोविन्द्रावान्ना शिक्षणाचे
हे वाचा - "गुलामगिरी" - महात्मा ज्योतिबा फुले
महत्व पटवून दिले. त्यामुळे त्यांनी पुन्हा ज्योतीबाला मिशनर्यांच्या इंग्रजी शाळेत टाकले. इंग्रजी शाळेत जावून ती
भाषा चांगली समजू लागल्यावर त्यांनी ‘ राईट ऑफ मॅन ‘(मानवाचे हक्क ) हे टॉम पेन'स या इंग्रज लेखकाचे
पुस्तक वाचले. आणि त्यांना हिंदू समाजातील व धर्मातील विषमता ईश्वर निर्मित नसून हे मानव निर्मित आहे हे
कळून चुकले आणि त्यात आणखी एक भर पडली जेव्हा एका मित्राच्या (परांजपे नावाच्या) वरातीतून " शूद्र "
म्हणून हाकालपट्टी करतात . या अपमानाने त्यांच्या अंगात अंगार फुलला मग त्यांनी विषमते विरुद्ध संघर्ष
करण्याचा निर्णय घेतला. हिंदू समाजातील मतलबी रुढीचा त्यांना तिरस्कार वाटू लागला.त्यांनी समाजाचे
बार्काईने निरीक्षण केले.त्यातून त्यांच्या असे लक्षात आले कि आपला हिंदू समाज जाती भेदाने आणि विशिष्ट
वर्गाच्या गुलामगिरीत राहून प्रतिगामी बनला आहे. स्त्रिया आणि शुद्र यांची कुचंबना होत आहे.आणि याच मुख्य
कारण आहे अशिक्षितपणा जर हे शिकले असते तर पण ह्यांना कोण शिकविणार . त्यावरून त्यांनी भावी
जीवनातील कार्याची दिशा ठरविली. ते सरकारी नौकरीच्या मागे न लागता समाज कार्य करायचे ठेवून कामाला
लागले. सामाजिक गुलामगिरी दूर करणे आणि सर्वांनला शिक्षणाची दारे खुली करणे यासाठी प्रयत्नशील राहणे हे
त्यांच्या जीवनाचे धैर्य ठरले.
हे वाचा - सावित्रीमाई फुलेजोतिबा फुले यांनी पुण्यात भिडेवाडयात ‘ मुलींची शाळा ‘ काढुन एकच खळबळ निर्माण केली. त्यांचे हे कार्य
तत्कालीन रूढीप्रिय समाजाला रुचले नाही.मुलींची शाळा काढण्यासाठी पूर्व तयारी म्हणून त्यांनी आपल्या
पत्नीला सावित्रीबाईंना प्रथम शिक्षण दिले. सावित्रीबाईनींहि आपल्या पतीच्या जीवन कार्याला मनापासून सहाय्य
केले. १८४८ मध्ये पहिली १८५१ मध्ये दुसरी आणि १८५२ मध्ये तिसरी मुलींची शाळा काढली. या शाळा व्यवस्थित
चालू लागल्या. मेजर कॉन्डी यांनी सरकार तर्फे ७५ रु अनुदान मंजूर केले. फुले यांच्या या महान सामाजिक
कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सत्कारही करण्यात आला. यानंतर जोतिबांनी सामाजिक सुधारनांकडे विशेष लक्ष
द्यायचे ठरविले.व्यक्ती स्वातंत्र्य, समता, आणि बुद्धीप्रामान्य या साठी ते झगडू लागले. सतीची प्रथा, विधवा
पुनर्विवाह, भ्रुणहत्या ,या समाज विघातक गोष्टींना त्यांनी विरोध केला, केवळ शाब्दिक विरोध न करता त्यांनी
पुढाकार घेउन ‘ बालहत्या प्रतिबंधगृह ‘ हि संस्था सुरु केली. समाजात स्पृश्य -अस्पृश्य असा भेदाभेद
पाळनारांचा रोश पत्करून त्यांनी आपल्या घराजवळचा पाण्याचा हौद सर्वांना म्हणजे अस्पृश्यांनाहि खुला केला.
शेतकऱ्यांचा मोठा वर्ग वर्षानुवर्ष अज्ञान, गुलागिरी याने त्रस्त झालेल्या होता . हा वर्ग असंघटीत होता म्हणून त्यांचे
हाल होतात हे ओळखून ज्योतिबायांनी कार्य केले . त्यातूनच ‘सत्यशोधक समाज’ स्थापन झाला . अज्ञान हेच
सर्व अनर्थाचे मूळ आहे अशी त्याची समजूत असल्याने त्यांनी शिक्षणाचे मह्त्व समाजाला पटवून देण्याचा प्रयत्न
केला. त्यांनी सामजिक प्रश्नांवर जे चिंतन केले होते . त्यावर लेखनही केले. ‘शेतकऱ्याचा आसूड’ ‘ब्राम्हणाचे
कसब’, ‘ गुलामगिरी’ ‘तृतीय रत्न(नाटक)’, ‘शिवाजीचा पोवाडा’, तसेच सार्वजनिक सत्यधर्म’, असे त्यांचे
लेखन प्रसिद्ध आहे. त्यांनी ‘अखंड ‘ नाव देऊन काही अभंगांचेही लेखन केले. मूलगामी आणि तर्कशुद्ध अशा
त्यांच्या चिंतनातून पुढील ओळी निर्माण झाल्या.
‘गुलामगिरी’ मधील त्या ओळी अशा आहेत
‘विधेविना मती गेली । मतीविना नीती गेली ।
नितीविना गती गेली ।
गतीविना वित्त गेले ।
वित्ताविनाशुद्र खचले ।
इतका अनर्थ एका विधेविना केला ।।।
शिक्षण हेच समाज – मानस परिवर्तनाचे प्रभावी मध्यम आहे, हे लक्षात येताच अस्पृश्यासाठी, स्त्रियांसाठी त्यांनीशाळा काढल्या , अनाथाश्रम काढले ,वृत्तपत्रे काढलीत ,धर्म जन्माने न मिळता माणसाने स्व:त च्या बुद्धीने
स्वीकारला पाहिजे. शेतकर्यानच्या व्यथा इंग्रज प्रश्यासनाच्या कानी पोहचविल्या,शेतकरी हा समाजाचा कणा
आहे. पोशिंदा, अन्नदाता आहे, असे मत त्यांनी मांडले.आणि जनजागृती केली. त्यांच्या साठाव्या वर्षी जनतेने
मुंबईस त्यांचा सत्कार करून त्याना ‘ महात्मा ‘ हि पदवी बहाल केली. ६३ वर्षे ते चंदना सारखे झिजले. प्रवास
केला, व्याख्याने दिली, लेख लिहिले,स्वातंत्र्य , समता, लोकशाही, विज्ञान,इ. या आधुनिक मुल्यांवर भर देवून
सामाजिक क्रांतीची पेरणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना गुरु मानले आणि बाबासाहेबानी घटनेच्या
रूपाने सर्वानाच मानवी न्याय आणि अधिकार मिळवून दिले .
सहज सोप्या भाषेत नेमकी स्पष्टता आनने ज्योतीबांना जमत असे. विच्यारांना कृतीशिलतेची जोड दिली.
असा हा महात्मा अविरत कष्टाने २८ नोहेंबर १८९० मध्ये त्यांचे निधन झाले.
सामाजिक अभिसरणाचे जनक !
हजारो वर्षे समाज सडवीणार्या मनुवादाला सुरुंग लावणारे पहिले सामाजिक क्रांतिकारक !!
शेतकर्यांसाठी विचारांचा आसूड उडवीणारे पहिले विचारवंत !!!
ज्यांचेमुळे आज आपण ताठ मानेने जगू शकतो ते आमचे ..
महात्मा ज्योतीराव फुले !!
साष्टांग दंडवत..!!
तुम्ही नसते तर आजही आम्हाला सनातनी मनुवादी मैल्यात सडावे लागले असते...
तुम्ही अजरामर आहात..!!
महात्मा फुले यांच्या महान कार्यास विनम्र अभिवादन !.