प्रकाश आंबेडकर | पंढरपूरात बंधुभाव वृद्धिंगत झाला...! प्रकाश आंबेडकर | पंढरपूरात बंधुभाव वृद्धिंगत झाला...! - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Tuesday, September 1, 2020

प्रकाश आंबेडकर | पंढरपूरात बंधुभाव वृद्धिंगत झाला...!






<img src="prakash-ambedkar-pandharpur-temple.jpg" alt="vba chief prakash ambedkar strike in pandharpur"/>


३१अॉगस्टला पंढरपूरातील विठ्ठल मंदिर उघडण्यासाठी आंदोलन झाले...!! या आंदोलनांचे अनेकांनी अनेक 

अर्थ काढलेतं...!! काहींनी त्या आंदोलनाला धार्मीकतेचा रंग दिला,काहींनी त्या आंदोलनाला राजकीय ठरविले, 

काहींनी या आंदोलनाला कट्टरवादाच्या साच्यातही बुडविण्याचा प्रकार केला...!!

व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती प्रमाणे संपूर्ण महाराष्ट्राचं समाजमन ढवळून निघालं हे मात्र नक्की...!!

आताचा काळ आणि वेळ लक्षात घेता, महाराष्ट्रातील कुठल्याच निवडणुका नसतांनाही या विषयाला राजकीय रंग 

देणे म्हणजे बेशरमपणाची हद्द ओलांडणे असेच म्हणावे लागेल,इतर विशेषण वापरता येणार नाही...!!

लॉकडाऊन करुन सहा महिने उलटतं आहेत, अशावेळी देशातील कोरोनाची लिंक तुटली का.??

कोरोना विषाणूंची लिंक तोडण्यासाठी लॉकडाऊन असे स्पष्टीकरण देतं देशाच्या पंतप्रधानांनी लॉकडाऊनची 

घोषणा केली होती...!!

लॉकडाऊन मुळे कोरोनाची लिंक तुटली नाही मग पुन्हा पुन्हा लॉकडाऊन कशासाठी.??

या प्रश्नाचं उत्तर लोकशाहीतील सरकार देणार आहे की, नाही...??

सरकार ऊत्तर न देता लॉकडाऊन वाढवून हुकुमशाहीच्या मार्गाने वाटचाल करीत असेल आणि त्यासाठी जनतेचं 

जगणं कठीण झालं असेल तर, लोकनेता आंदोलन करणारं हीच काळाची आणि वेळेचीही हाक होती, म्हणून 

मंदिर उघडण्यासाठी आंदोलन हा राजकीय विषय न राहता तो सामाजिक,आर्थिक आणि मुल्याधिष्टीत बनला 

आहे....!!

सामाजिक या अर्थाने की, देशातील दारुची दुकाने सुरू करतांना कुठलेही बंधन नाही आणि तात्काळ दारु विक्री 

सुरू केली,ज्याचा समाजाच्या मोठ्या घटकांवर विपरीत परिणाम होतो ते कृत्य शासना मार्फत केले जाते परंतु 

समाजाला आध्यात्मिक खाद्य पुरविणारी केंद्र म्हणजेच प्रार्थना स्थळे ती कुठल्याही धर्माची असोत ती सुरु करु 

नयेत आणि मागणी करुनही आणि उपोषण करुनही सुरू करु नयेत हा सामाजिक आघात झुगारून देण्यासाठी 

हे आंदोलन सामाजिक दृष्ट्या महत्त्वाचे होते., म्हणूनच त्याला सामाजिक आयाम आहे...!!

मंदिर प्रवेशाचे आंदोलन हे आर्थिक बाबीत मोडते यासाठी की, मंदिराच्या परिसरातील दुकानदार, टपरीधारक 

इतर विक्रेते, वाहनधारक आणि पर्यटनाच्या संदर्भातील सर्वच आर्थिक व्यवहार मंदिर बंदीमुळे थप्प झाले होते 

हेच वास्तव आहे...!!

गेले सहा महिने व्यवसाय बंद असुन घरातील चुल बंद नाही आणि खाणारे तोंडही बंद नाहीत मग छोट्या छोट्या 

व्यवसाईकांची रोजीरोटी कशी चालतं असेल,..??

शासनाने त्याचाही विचार करायला पाहिजे होता...??

दारुची दुकाने सुरू करतांना तुम्ही महसूलाचा संदर्भ देता मग व्यवसाईकांच्या धंद्याचा आणि त्या पासुन 

मिळणाऱ्या महसूलाचा शासनाला विसर का पडला...??

मंदिर प्रवेशाचे आंदोलन हे मुल्याधिष्टीत या अर्थाने की, शासनाला आपला कार्यभार लोकशाही मार्गाने 

चालवायचा आहे की, हुकुमशाही वृत्तीने...??

लोकशाही मार्गाने निवडून आलेले सरकार सतत सहा महिने जनतेला घरात डांबून काय साध्य करु इच्छित 

आहे...??

आम्ही म्हणू तसेच वागा ही वृत्ती आणि कृती लोकशाहीत बसते का.??

आम्ही तेवढे शहाणे बाकीचे सर्वचजण मुर्ख आहेत अशा आविर्भावात मंदिरात जाणारा भाविक, महाविद्यालयात 

जाणारा तरुण आणि सार्वजनिक कार्क्रमात हजेरी लावणारा प्रत्येक भारतीय नागरिक गबाळ्या आहे त्याला 

आपलं जगणं आणि मरणं कळतं नाही म्हणून आम्ही त्याला मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढण्यासाठी ही बंधणे 

लादतं आहोत असे हे शहाणे सरकार समजतं असेल तर ही वृत्ती कोणती आहे...??

मित्रांनो ही गुलामी लादण्याची सुरुवात आहे म्हणून मंदिर प्रवेशाचे आंदोलन हे मुल्याधिष्टीत आहे...!!

गेल्या सत्तर वर्षाचा सांसदीय लोकशाहीचा इतिहास पाहिला असता हेच लक्षात येते की,इथे जातीच्या नावाने 

पुढारी तयार झाले त्यांनी समाजाला जातीची नशा चढवून सांसदीय सभागृहाचा दरवाजा ओलांडला...!!

काहींनी धर्माचा आधार घेतं राजकीय फड गाजवायला सुरुवात केली आणि इथला बंधूभाव संपुष्टात आणण्याचं 

पातक केलं हा इथला इतिहास आहे...!!

prakash ambedkar speech pandharpur protest watch here

स्वातंत्र्य,समता बंधुता आणि न्यायाची हमी देणा-या सांसदीय लोकशाहीच्या भारतात, जातीच्या आणि धर्माच्या 

भिंती ऊभ्या करुन समाजाला आणि पर्यायाला राष्ट्राला विभाजीत करणा-या प्रवृत्तीला सडेतोड उत्तर देणा-या 

मंदिर प्रवेशाच्या आंदोलनामुळे पंढरपूरात बंधुभाव वृद्धिंगत झाला आहे...!!

काल पंढरपुरात अनेक जातींचे हिंदू धर्मातील भाविक एकत्र येऊन आंदोलन करीत होते,त्याच बरोबर धर्माच्या 

भिंती ओलांडून, बौद्ध, मुस्लिम,शिख, लिंगायत, आणि आदिवासी अशा वेगवेगळ्या धर्माचे अनुयायी सुद्धा एकत्र 

येऊन मंदिर प्रवेशाचे आंदोलन करीत होते, हे कशाचे द्योतक आहे,आम्हाला वाटते भारतीय सांसदीय 

लोकशाहीला अभिप्रेत असलेला बंधुभाव पंढरपूरात ठसठशीतपणे दिसला...!!

संवैधानिक मुल्यांची जोपासना करणारे आंदोलन पंढरपूर नगरीत झाले हेच सत्य होय...!!

जयभीम.

भास्कर भोजने | वंचित बहुजन आघाडी



No comments:

Post a Comment