चलो दिल्ली । जंतर मंतर । ४ मार्च २०२० । प्रकाश आंबेडकरांची हाक चलो दिल्ली । जंतर मंतर । ४ मार्च २०२० । प्रकाश आंबेडकरांची हाक - बहुजन जागृती

बहुजन जागृती

डॉ बाबासाहेब आंबेडकर : बहुजन समाजाची राजनीतिक आणि सामाजिक चळवळ

Saturday, February 22, 2020

चलो दिल्ली । जंतर मंतर । ४ मार्च २०२० । प्रकाश आंबेडकरांची हाक

<img src="prakash-ambedkar-calls-chalo-delhi.jpg" alt="prakash ambedkar calls praotest against caa nrc at jantar mantar"/>



राज्यासह देशात "सीएए , एनआरसी आणि एनपीआर" ( CAA , NRC and NPR ) च्या विरोधात मुस्लिम

संघटनेबरोबर गैर मुस्लिम्सनघटनाही रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. हा कायदा प्रामुख्याने मुस्लिम 

समाजाविरोधात आहे असा गैसमज पसरविला जात आहे.पण या कायद्यामुळे देशातील ४०% हिंदूही यात 

भरडले जाणार आहेत,असं मत वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष बाळासाहेब तथा प्रकाश आंबेडकर यांनी केलं 

आहे.   

प्रकाश आंबेडकर म्हणतात कि राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस , काँग्रेस आणि शिवसेना गठीत महाविकास आघाडीचं 

सरकार आहे.यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी "एनपीआर" ला होकार दिला आहे आणि त्याबाबतची प्रक्रिया

१ एप्रिल पासुन राज्यात होणार आहे . काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं याबद्दल आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. आत्ता 

पुरोगामी म्हणवून घेणारे हे पक्ष आता सरकारसोबत नांदणार का ? असा थेट सवाल प्रकाश आंबेडकरांनी 

उपस्तिथ केलाय . 
प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात जंतर मंतर दिल्ली येथे ४ मार्च रोजी "सीएए , एनआरसी आणि एनपीआर" च्या विरोधात जनआक्रोश रॅलीचं आयोजन . 
सीएए , एनआरसी कायद्यासंबंधी आंदोलन करणाऱ्यांसोबत केंद्र सरकारने कोणतीही चर्चा केलेली नाही

शाहिनबाग प्रमाणेच देशात इतर भागातही आंदोलने चालू आहेत . त्यामुळे या सर्व आंदोलनाकरांना

४ मार्च २०२० रोजी दिल्ली येथील एकत्रित येण्याचं आवाहान प्रकाश आंबेडकरांनी केलय. यात आतापर्यंत 

देशातील २५ विविध संघटना सहभागी झाल्या आहेत .या आंदोलनामध्ये कोणताही राजकीय पक्ष सहभागी होऊ 

शकतो असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
हे वाचा : महाराष्ट्रात दिल्लीचा प्रयोग होणं अशक्य ?

आंदोलनाचा मुख्य उद्दिष्ट सीएए , एनआरसी हे कायदे मुस्लिमांसहित हिन्दुनाहि बाधित आहेत.तसेच या 

सरकारच्या विरोधात निषेध नोंदविणे हा आहे.देशाचं संविधान आहे तोपर्यंतच आपण आंदोलन संघर्ष करू 

शकतो त्यामुळेच संविधान वाचावा देश वाचावा असा निर्धार रॅलीत होणार आहे.

सरकार यात सामील होणाऱ्या आंदोलकांना अटकही करू शकते . या आंदोलनात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद 

केजरीवाल याना निमंत्रित करण्यात येणार आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

No comments:

Post a Comment